गेल्या महिन्यात आमच्या कुटुंब कबिल्यासह [ या कबिल्यामधे घरातले आणि मामा मावश्यांची कुटुंबेही होती ! एकूण २५ जण .. ] तिरूपतिला जाऊन आलो. तसा मी तिथ आता पर्यंत ५-६ वेळा जाऊन आलोय.. मस्त जागा आहे. मला तरी तिथलं वातावरण खूप भारी वाटतं ! दिवस भर हुंदडायच आणि भूक लागली की फ्री मिल मधे किंवा स्टॉलवर भातावर ताव मारायचा ! मला खरतर डोंगर चढत जायच होतं पण यावेळेस असं फार काही करता आलं नाही. :( पुढल्यावेळी नक्की करणार आहे . ..
तीन दिवस थांबलो होतो तिरूमला मधे, [ तिरूपती हे गाव पायथ्याशी येतं आणि व्यंकटेश्वराचे देवस्थान आहे डोंगरावर तिरूमला मधे ] तिरूमला हे डोंगरावर आहे त्यामुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न होतं एकदम आल्हाददायक ... आमच्या स्वागताला स्वत: वरूण राजे ही हजर झाले त्यामुळे प्रवासाचा शीण ही गेला.. [ आणि पुढे ही वरूण राजाने लुड्बुड न करता दडी मारल्याने फिरायचा उत्साह ही टिकला ! :P] पहिल्या दिवशी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पहिला शोध घेतला तो चांगल्या हॉटेल्चा .. आणि इतर सोयी पाहून वेळ घालवला.. दुसर्या दिवशी ११ वाजताच दर्शन होत. सव्वा तासातच श्री व्यंकटेशाचे दर्शन झाले.. लाडू घेतले. .. :D बर्याच ठिकाणी प्रसादावर ताव ही मारला.. मोफत प्रसादाचा अनुभव घेतला [ अनुभवच .. एक वेळेस काही हजार माणसं जेवताना पहाणं आणि त्यातला एक भाग असणं हा एक अनुभवच नाही का ! ] तिसर्या दिवशी तिथली आधी पाहिलेलीच पापविनाशनम, आकाशगंगा, वेणूगोपाल मंदीर, विष्णू पद, शीलातोरण अशी ठिकाणे ही पाहिली.
मला तिरूमला वर रहाणं का कुणास ठाऊक अगदी सहज वाटतं .. अनोळखी असं वाटतंच नाही. त्यामुळे एकदम मस्त वाटलं .. बर्याच वेळा मी एकटाच फिरून आलो .. खूप फोटो काढले.. ते इथे टाकले आहेत
तिथल्या एक चहावाल्याशी पण आमची मैत्री झालेली.. व्हायचं काय की , सगळे जमले की पत्त्याचा डाव रंगायचा .. गड्ड्या झब्बू .. नाहीतर बदाम सात .. जो गाढव होईल त्याने चहा सगळ्यांना द्यायचा .. त्यामुळे दिवसा रात्री कधीही .. मनात आलं की आम्ही या चहावाल्याकडे जायचो .. आणि फर्माईशी सुरू .. बर ते पाहून इतर चहावाले ही वैतागलेले... शेवटच्या दिवशी आम्ही सांगीतल की उद्या आम्ही नाहीय . तेव्हा त्याचा चेहरा पडला ... त्याचे काही व्हिडीओज इथे टाकले आहेत एकूण ट्रीप मधे धमाल मजा आली
काही गोष्टी मात्र खटकल्या त्या म्हणजे सर्व मंदीरांच व्यवसायिकरण झालं आहे . तिकीटाने दर्शन होतं .. खूप बाजार मांडला आहे याचा भाव मनात दाटून येतो. पण ते कुठे नसत ? .. सगळीकडे तेच आहे. .. असो .. चांगली गोष्ट अशी की किती ही झालं तरी सोयी ही तितक्याच आहेत . .. रस्ते फूटपाथ स्वच्छ आहेत .. खूप कमी, [ खरंतर नगण्य ] भिकारी दिसतात .. धर्मशाळेत खूप चांगल्या स्वच्छ रूम आहेत .. गरम गार पाण्याची २४ सोय सर्वत्र आहे .. अश्या अनेक सोयी मोफत वा खूप कमी खर्चात मिळतात.. :)
तिरूमला पाहिल्यावर आम्ही तिरूपति मधे खाली उतरलो .. आणि तिथे पद्मावति, गोविंदराज मंदिरांमधून दर्शने घेतली .. मग रेलवे स्थानकावर आलो आणि हरिप्रिया एक्स्प्रेस ने कोल्हापूर गाठले .. दोन दिवस तिथे थांबलो .. दुसर्या दिवशी देवीला अभिषेक केला .. प्रसाद घेऊन पुण्याला पोहोचलो...
तुम्ही कधी गेलाय तिरूपतिला ? काय नवीन पाहिल ते जरूर सांगा !
Comments