Skip to main content

नातं.. कोडं.. आधार .. गरज.. नक्की काय ?

माणसाला कोड्याची ओढ खूपच आदिम काळापासूनची, स्वत:ला विविध प्रश्नांनी वेढून घेणं हा त्याचा छंदच होता जणू.. आणि तो आजतागायत आहे. मग ते कोणत्याही स्वरूपाचं ढंगाच असो. मला ही असे काही प्रश्न पडत असतात.. असाच एक प्रश्न.. "नातं" ..
नात्याचा अर्थ, नाजूकपणा .. ब्ला ब्ला ब्ला मी इथ मांडणारच नाहीये.. त्यावर माझी लिहीण्याची ताकद नाही आणि मी लिहीलंच तर तुमच्यात ना ते सहन करण्याची.. फक्त मला प्रश्न पडलाय नातं म्हणजे काय..
न + आंत = नातं ?
कित्येकदा असं सहज म्हणून जातो . अरे माझा अमुक अमुक आहे .. सहन करावं लागतं सांगतो कोणाला.
खरतर दोन मनं जवळ आली की एक जे तयार होतं जे फक्त त्या दोघांनाच खर कळतं ते नातं (आता लगेच ते दोघ म्हणल्यावर प्रेम.. लफडी असे घासलेले शब्द मनातही आणू नका.. दोन गुंडांमधे पण नातं असतंच की मुन्नाभाई आणि सर्किट सारखं) मग त्या गोष्टीला नात्याची खरतर गरज नसते.. त्याला मैत्री अस नाव तरीही लोक देतातच.. माहित नाही का..कॉलेजमधे इतके मित्र होतात .. त्यातले किती संपर्कात रहातात.. त्तरीही आपण मित्र म्हणतो.. अडचणीच्यावेळी आपण एकमेकांना मदत करतो .. आपल्याशी काही नातं नसताना जेंव्हा मित्र ब-याचदा गायब असतात.. त्याला आपण लगेच नाव देतो .. माणुसकीच्या नात्यानं .. अरे .. काय गरज... आणि राखी बंधनाला किंवा इतर डेज ना तर उत येतो .. काहि मुली तर मुद्दाम संशय येउ नये किंवा संरक्षण म्हणून मानलेला भाऊ आणि मग पुढे ब्ला ब्ला .. ओ मॅन .. काय हे.. अरे साध कमीत कमी नात्याने जगूच शकत नाही माणूस..
आणि तोच माणूस बिझनेस करताना माणूस मात्र सर्व नाती सहज विसरू ही शकतो आणि फक्त तीच पैशाकरता जपूही शकतो.. पण खरंच किती ती निभाऊन नेतो .. ते देवालाच ठाऊक !

हे नातं कसं असत माहित आहे का? शाईचा एक थेंब जर ग्लासभर पाण्यात टाकला तर जसा तो पाण्याचा रंग बदलतो.. किंवा किमान त्याच्या अस्तित्वात बदल आणतोच, त्याचा रंग बदलतोच .. तस तुम्ही या जगात जन्माला आल्यावर काहीसं होतं .. एकदम तुम्ही सर्वांचे होऊन जाता आणि तुमच्या हातात फक्त नाती उरतात. बर ही नाती आहेत तेवढी पुरेशी वाटत नाहीत की काय म्हणून आयुष्याच्या एका महत्वाच्या वयात आपण अजून नाती वाढवतो. कारण .. ते ही तुमच्या हातात नसतं .. इतर नाती जपायची असतात ना !
अजून ही अपूर्णच आहे हे सर्व .. पण तरीही पब्लिश करणार आहे..
कदाचित हा थोडा निबंधाकडे किंवा रटाळ गोष्टीकडे गेलाय लेख .. पण ठीक आहे.. वाचणारे माझे कोण आहेत तरी असे.. कंटाळले तर विन्डो बंद करतील.. किंवा शिव्या घालतील.. पण मी लिहिलंय ते हेच आहे.

Comments

Popular posts from this blog

टॅगा टॅगी .. - खो !

हेह्हे .. मस्तच आहे ही कल्पना . . . कुणीही मला टॅगल नाहीय . . आणि टाकलं ही नाहीय .. तरीही लिहीलंय .. :)       ये... मला पण कांचन ताईने  आधीच टॅगल होतं पण लिंक चुकीची होती म्हणून कळायला उशीर झाला ..असो .. : हॅप्पी ! : 1.Where is your cell phone? माझ्या कामाच्या टेबलावर 2.Your hair? काळे सरळ .. शहाण्या मुलासारखे !! :P 3.Your mother? शिक्षिका, माझ्या कलाकृतिंची पहिली प्रेक्षक आणि टीकाकार.. 4.Your father? शास्त्रज्ञ .. आणि प्रेरणास्थान .. :) 5.Your favorite food? तर्री मारलेली मिसळ, मग फोडणीची पोळी, पुरणपोळी, मराठी सर्वच्या सर्व पदार्थ.. [मुद्दाम म्हणून कार्ले, मुळा आणि शेपू बंद ..] चायनिज मधील सर्व व्हेज ..इटालियन पास्ता व इतर काही डिशेस.. बाकी आंतरराष्ट्रीय खाणे अजून खाल्लेले नाही.. एकूण मी खाद्यसंस्कृतिरक्षक आहे... :D

पंचममय शाम

"कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का लेलो मजा.. " काल रात्री आर डी च्या चाहत्यांनी म्हणजे पंचम मॅजिक या संस्थेने आयोजित कार्यक्रमाला गेलेलो. टिळक स्मारक मंदिरात नऊ वाजताचा कार्यक्रम होता, पण माझे काम लवकर आटोपल्याने साडेआठलाच पोहोचलो, मला आयोजाकापैकीच एकानी बोलावले होते त्यामुळे पास मिळाला होता, आधीच आत जाऊन बसलो होतो .. आत गेलो तर एक ३०-४० टाळकी गप्पा मारत मारत काम करत होती .. सगळी माझ्यापेक्षा १०-२० वर्षांनी मोठी .. मला वाटल आता बोर होणार कार्यक्रम सुरु होईपर्यंत पण हळूहळू त्याच्या गप्पात मी कधी मिसळलो ते कळलेच नाही. स्टेजवर मोठा पंचमदांचा फोटो, त्याच्याजवळ स्क्रीन, कडेला स्टेन्डवर पंचमचेच तैलचित्र, काळे [ फक्त याच कार्यक्रमासाठी पंचमचे फोटो प्रिंट करून तयार केलेले ] टी-शर्ट घालून कामात गर्क असलेली माणसे, आणि मोठ्यांदा लावलेलं हे गाणं! त्यातही वेगवेगळया विषयावर आणि टाईमपास गप्पा व चहा! जो महोल तयार झाला होता तो खरोखर अवर्णनीय! आर. डी. मय झाला होत सर्व .. हा खरोखर आर. डी. चा करिष्माच आहे कि फक्त एका माणसाच्या प्रेमापोटी, जो त्यांना आयुष्यात कदाचित भेटला असेल वा नसे

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो .. सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.